गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

ती.....,

              भारतामध्ये दर वर्षी प्रामुख्याने १२ लाख कर्करोग रुग्ण नोंद होते व ८ लाख रुग्ण मृत्यू पावतात. म्हणजे हि आकडेवारी पाहिलं असल्यास कोविद - १९ पेक्षा हि भयंकर आहे. यात पुरुष व महिलांचे प्रमाण समान असल्याचे दिसून येते. पण जेव्हा आपण पुरुष संबंधी विचार केला तर त्यांना कर्करोग होण्याचं मुख्य कारण व्यसन आहे. याबाबत प्रत्येक जन बोलत त्यामुळे मला त्याबद्दल न बोलता आपली विचार सरणी आणि महिला कर्करोग यावर थोडासा प्रकाश टाकावासा वाटतो. 

              घरामध्ये आई जेव्हा नाश्त्यासाठी ईडली करते,तेव्हा तिची हि खूप इच्छा असते गरम - गरम खावेत. कारण गरम इडलीच फारशी चविष्ट लागते, पण होत उलट - आई सर्वाना गरम इडली खाऊ घालते नंतर ती सर्वांचे डबे भरते यादरम्यान परिवारासाठी केलेल्या इडली उरतात व त्या थंड होतात. मग आई अन्न कशाला वातोळ करायचं म्हणून थंडच इडली खाते. तसेच आपण tv मालिका मध्ये पाहतो, जी नट असते ती सर्व परिवाराचे जेवण झाल्यानंतरच जेवण करते. मग यावरून असं दिसून येत कि आपण भौतिक रित्या आधुनिक झालेलो आहोत पण विचाराने आणखी मागास आहोत हे नक्की. 

               आता वरील उदाहरण देण्याच कारण यासंबंधी थोडी चर्चा करूया. वर म्हटल्या प्रमाणे स्त्री व पुरुषांना कर्करोग झालेली आकडेवारी हि अगदी समान आहे. मग जेव्हा विचार केला कि जास्त प्रमाणात स्त्रिया व्यसन करत नाहीत तरीही त्यांना कर्करोग चे प्रमाण पुरुष बरोबर का ? तेव्हा माझ्या काही निरीक्षणात या पुढील बाबी आलेल्या आहेत. महिलांमध्ये प्रामुख्याने ब्रेस्ट व सेर्विकल कॅन्सर चे प्रमाण जास्त आढळून येते, त्यानंतर लीप,स्टमक,लंग कॅन्सर चे प्रमाण दिसते. मग एवढे व नाना प्रकारचे कॅन्सर महिलांनाच का ? याचे थोडेसे उत्तर तुम्हाला पटतात का बघा,

               मुली वयात आल्यानंतर मासिक पाळी चालू होते. हे आपण सर्वांनाच माहित आहे पण त्यास आपण नैसर्गिक न घेता अपवित्र, किंवा अन्य काहीतरी समजतो व इथूनच खऱ्या अर्थाने कर्करोग साठी वाव मिळते. मासिक पाळी दरम्यान फक्त रक्तस्त्राव न होता एस्त्रोजन आणि प्रोजेस्त्रोन सारखे हार्मोन देखील रिलीज होतात. व मोठ्या प्रमाणात प्रोटीन, हिमोग्लोबिन चा ऱ्हास या दरम्यान होतो. यामुळेच हिमोग्लोबिन चे प्रमाण हि पुरुष व स्त्री मध्ये समान नसते. व हि मासिक पाळी ची प्रक्रिया वारंवार होत असल्याने स्त्री चे शरीर व पेशी या कर्करोगास शिकार होतात. यामुळे गर्भाशय चे कर्करोग आपणास भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येते. यावर उपचार हि आपण करू शकतो पण आपली समाज व्यवस्था मुळे स्त्री सर्व सहन करते व सर्वात जास्त झाले असता तिला उपचार मिळतो पण तेव्हा खूप वेळ होत असतो, त्यामुळे खरच मासिक पाळी वगैरे यास नैसर्गिक आहे म्हणून आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. 

               आपल्याकडे मा का दुध पिया है तो मर्द_ म्हणजेच बाळ जन्मल्या नंतर तो आईच्या दुधावर च काहीदिवस वाढतो. व नवजात शिशु चे ३०२ हाडे असतात ते पुन्हा कमी होत जातात. मग या हाडांना अतिशय पोषक बनवण्यासाठी आईचे दूष खूप महत्वाचे असते. आईंच्या दुधामधून मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम शिशु ला मिळत असते ज्यामुळे तो पुढे सशक्त होतो,मात्र आईच्या शरीरातील calcium,protein,etc. कमी होतो तसेच याच्या पूर्वी म्हणजे अर्भक असताना हि तो आई च्या शरीरावरच पूर्णता अवलंबून असतो. 

                यासर्व मुळे आईचे शरीर कमकुवत होत असते, ज्यामुळे वयाच्या ४० वर्ष पर्यंत येत असताना आईला कर्करोग अथवा अन्य त्रासास सामोरे जाववे लागते. हे असे असताना हि वरील उदाहरण प्रमाणे आई ला योग्य प्रमाणात न्यूट्रीशन मिळत नाही, ज्यामुळे तिच्या शरीराचा फक्त ऱ्हास होत असतो.

               वरील परिस्तिथी शहरात थोडीशी बेटर आहे पण ग्रामीण भागात तर खूपच वाईट आहे. ग्रामीण भागात मुलींची मोठ्या प्रमाणात घुसमट होत असते. शौचालय नसल्या कारणाने मुलीना सकाळी अगदी लवकर उठावे लागते, याचसोबत घुसमट च्या भीतीने त्या योग्य प्रमाणात जेवत हि नाहीत याचाच परिणाम न्यूट्रीशन वर होतो व पुढे शरीरातून होणारा ऱ्हास यामुळे तिची पृकृती हि खालावत असते. 

            हा शारीरिक ऱ्हास भरून काढण्यासाठी न्यूट्रीशन तर लागेलच पण आपल्या समाजाची मान्यता हि हवीय म्हणजे तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांना आपण समजून घेतलं पाहिजे कि ते सर्व नैसर्गिक आहे व यामध्ये लाजिरवाणी वगैरे बाब काहीच नाही पण आपल्या समाजाची घडण असल्यामुळे आज महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

शेवटी एवढच, विचार बदला - जग नक्की बदलेल !!!!!

- प 1 Nilewad  

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

समाज व समलिंगी आणि तृतीयपंथी

               छक्क,हिजडा,षंढ,जोगप्पा,ई. नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे असणार जो शरीर यष्टीने  पुरुष अथवा महिला पण स्वभावाने स्त्री अथवा पुरुष त्यासच आपण शुद्ध भाषेत तृतीयपंथी म्हणतो. तृतीयपंथी भारतीय समाजाचा अतिशय पूर्वी पासून हिस्सा आहेत पण आपल्या गलीछ् मानसिकतेचा शिकार झाल्याने त्यांना त्यांची लढाई आजही लढावी लागत आहे. त्याबाबतच आज थोडा आपण विचार करूया,.....

               मी,तुम्ही खूप नशीबवान आहोत...का तर आपणास आपल्या लिंग बद्दल खात्री आहे. व विशेष म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी शारीरिक आकर्षण आहे.ज्यामुळे आपण स्त्री,पुरुष या वर्गामध्ये काही न करता बायोलोजीकली विभागलेले आहोत. ज्यामुळे आपणास आपला साथीदार हा सहज मिळून जातो. पण काही क्रोमोसोमल अब्रेशन मुळे आपल्या समाजात तृतीयपंथी, समलिंगी व उभयलिंगी हि अस्तित्वात आहेत. त्यांना नैसर्गिक रित्या सम लिंगी किंवा बहुलिंगी आकर्षण असते.पण आपल्या समाजात अशा संबंधाना मान्यता नाही. मग त्यांना आपला साथीदार निवडीसाठी अतिशय सहन करावे लागते. जेव्हा बालवयात त्यांना आपण स्त्री - पुरुष नसून आपल्याला वेगळ आकर्षण आहे हे समजत त्या क्षणीच घरचे दरवाजे आपल्यासाठी बंद होतात.व तेथून चा प्रवास आपण कल्पना करू शकत नाही.भारता मध्ये २५ लाख तृतीयपंथीय आहेत व त्यातील 2 लाख हे एडस् या आजाराचे शिकार आहेत.याचे मूळ कारण हेच कि त्यांना समाज मान्यता नसल्यने त्यांनी prostitution तसेच अन्य घातक पर्यायांचा वापर केला.  

               भारतीय संविधानाच्या सरनाम्या मध्ये न्याय : सामाजिक,आर्थिक व राजकीय असा उल्लेख आहे.तसेच कलम १४ कायद्यापुढे समानता. यानुसार त्यांना समाजात हक्क मिळायला हवा पण भारतीय दंड संहितेच्या (१८६०) सेक्शन ३७७ नुसार निसर्गाच्या विरुद्ध केलेली कोणतीही क्रिया त्यास गुन्हेगार संबोधले जाईल असे १८६१ मध्ये नमूद करण्यात आले. पण याचा अर्थ समलैंगिक संबंध हे कायद्याने गुन्हा आहे हे ठरवण्याचे कार्य समाजाने केले. times of India च्या report नुसार २०१६ मध्ये भारतामध्ये १४९१ जणांना ३७७ अंतर्गत अटक करण्यात आलेली होती त्यात २०७ नाबालिक व १८ महिला यांचा समावेश होता.ज्यामुळे साहजिकच त्या सर्वांच्या मुलभूत हक्काचे हनन होत होते. 

२०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालय ने कलम २१ अंतरगत व्यक्तीचा खाजगी अधिकार असल्याचे नमूद केले व कदाचित त्यामुळेच २०१८ मध्ये सर्वोच न्यायालयाने २०१४ मधील निकाल ओवररूल करून LGBTQ समुदायास लिंग चा दर्जा मिळवून दिला. व त्या अनुषंगाने भारतीय संसदेने २०१९ मध्ये कायदा हि तयार केला. 

                आज लिंग चा दर्जा मिळून देखील त्यांना सर्व अधिकार समाजामार्फत मिळालेले अद्याप नाहीत. रेल्वे किंवा अन्य ठिकाणी पैसे मागण्यास आल्या नंतर आपण त्यांना हाकलतो किंवा अतिशय खालच्या दर्जाचे म्हणत तुच्छ् तेणे आपण त्यांच्यासोबत व्यवहार करत असतो पण घरात मूल जन्माला आल्या नंतर त्याला आशीर्वाद मात्र आपण तृतीयपंथीय कडून घेतो.... 

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

स्त्री सौंदर्य कि बंधने ?

                  अलीकडेच  वाचनात आलेलं कि तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही आपल्या प्रेदेशातील रस्ते हे अगदी महिलेच्या गाला प्रमाणे करू !!!! हे विधानैकताच कुठेतरी मनात तिरस्कार भरून आला. या पितृसत्त मानसिकते विरुद्ध त्यानिम्मिताने ....

                         पितृसत्ता म्हणजे स्त्रियांच्या अधिकारांचे हनन करून पुरुषी सत्ता समाजात गाजवणे हे आपणास व्याख्येरूपी सांगता येत. याच पितृसत्ता चा मान सदैव टिकून राहावा यासाठीच आपण स्त्रियांवर सौंदर्य रुपी बंधने घातली आहेत. ती कोणती व कशा प्रमाणे आपण पितृसत्ता टिकवून ठेवेत आहोत ते आपण पुढे थोडक्यात पाहणार आहोत.

             स्त्रियांनी केस वाढवावे त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडत असते असे आपण नेहमी दूरदर्शन तसेच अन्य ठिकाणी च्या जाहिराती मधून पाहतो पण खरे पहिले असता पितृसत्ता टिकवण्य मध्ये एखाद्या स्तीयांचे केस ओढले कि तिची ताकत हातात येतेच सोबत त्यांना आपण भिरकावु शकतो म्हणजेच केस या सौंदर्य रुपी वस्तू ने स्त्रियांना पुरुषांनी हातात ठेवले आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर बांगड्या - खरे पहिले तर आज शहरी मुली यांचा वापर फार कमी करतात पण नक्की ग्रामीण भागात आज हि वापर मोठ्या प्रमाणात होतो तर या बांगड्या न्वये आपण स्त्रियांची हाता मधील काम करण्याची ताकद कमी करत आहोत हे जाणवून येत कि नाही ? अगदीच हो कारण कोणतेही काम करत असताना त्यांना हातातील बांगड्या मुळे त्यांची काम करण्याची स्पीड अगदीच कमी होते. याच सोबत पायात देखील चैन आणि जोडवे - मान्य आहे हि एक धार्मिक बाब पण खरच त्यांनी काही फरक पडत नाही का ? जर तुम्ही आधुनिक नसाल तर नक्कीच हो पण जर कदाचित तुम्ही आधुनिक आहात तर तुमच्या पायांवर / चालण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅट वाक आहेच. यावरून तुम्ही आधुनिक असा किंवा प्राचीन स्त्रियांवर बंधने घालण्यासाठी समाज नेहमी पुढेच येत आहे. यामुळे सौंदर्य याच्या नावाखाली पुरुषी समाजाने स्त्रियांचे नखे वाढवली. त्याला पोलिश केले असता तेही सौंदर्य पण खरे पहिले तर तुमचे नखे जास्त लांब असल्याने तुमच्या हातावर नियंत्रण ठेवण्यात अगदीच मदत होते.

             मध्ययुगीन जगाचा इतिहास पहिले असता गुलाम मोठ्या प्रमाणात प्रचलित होते अगदी त्याच पद्धतीने आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये आपण पितृसत्ता टिकवण्यासाठी स्त्रियांना गुलाम केलेलं आहे अगदीच त्यांच्या हात पाया मध्ये बेड्या नाहीत पण संदर्य रुपी बेड्या - केस,नातानी,झुमका,बांगड्या,नखे,जोडवे व अन्य या सर्व महिला सशक्तीकरण मध्ये आडव्या येणारे संकट आहेत. तसेच आपण पडद्यावर एखाद्या अभिनेत्री ला पहिले असता तिने कदाचितच या सर्व वस्तू परिधान केलेल्या असतात.तरी देखील त्या सौंदर्याने परिपूर्ण असतात न...पण आपण हि मान्य केल कि स्त्री सशक्तीकरण साठी याच गोष्टी बाधा टाकत आहेत पण याच सोबत आणखी म्हणजे पुरुषांची स्त्रीयान्प्रती मानसिकता...तुम्ही एखदे वेळी हॉटेल/लॉज किंवा अन्य ठिकाणी गेले असाल तर प्रमुख्याने तुम्हाला आढळून येईरीसेपानिष्ट हे पद फक्त महिलांकडे असते,म्हनाजेच मला त्या स्त्री बद्दल किंवा त्या पद बद्दल काही म्हणायचं नाही तर फक्त एवढाच कि एखादे वेळी आपण जर कोणाची वाट पाहत असू किंवा अन्य कारणानिमित्त आपण काही क्षण तिथे बसू तर त्या स्त्रीचे आपण सौंदर्य दर्शन करावे हे अगदीच चुकीचे, म्हणजे पुरुष एखद्या स्त्री चे संदर्य हे करमणुकीचे साधन म्हणून आपण सर्वांपुढे सदर करत असतो. 

               अशा प्रकारच्या अनेक मानसिकता आपल्या समाजात आहेत त्या सर्व मानसिकते वर आपण सर्वांनी मिळून विजय मिळवला पाहिजे तेव्हाच कदाचित आपण स्त्री पुरुष समानता झाली हे ठाम पाने म्हणू शकतो.