सोमवार, २४ जानेवारी, २०२२

शिक्षणव्यवस्था

          काल मी इस्त्री वाल्याकडे कपडे आणण्यासाठी गेलेलो. थोडा वेळ लागणार होता.त्यामुळे त्याच्या जवळील बाकावर मी बसलो. एवढ्यात त्याने प्रश्न केला, काम काय करता ? मी हसत उत्तर दिल, नाही काका... आणखी मी शिकत आहे. अच्छा, काय शिकत आहेस मग ? मी म्हटलं माझ M.A. चालू आहे. त्यावर त्याने तोंड हिरमुडत हुं, मग काही कामाचं नाही, असं माझ्या सरळ तोंडावर म्हटलं.... ते बरोबर हि होत, कारण वडिलांना मदत करण्याच्या वयात मी शिक्षण घेत आहे व ते जे सर्वाना माहिती कि यातून काही होणार नाही. पण महत्व आहे त्या पास झालेल्या कागदाला, एवढच...

          आज आपल्या अभ्यासक्रमात पर्यावरण जन जागृती साठी विषय आणला आहे, पण सर्व विद्यार्थी त्याला अभ्यासक्रमाचा विषय समजून फक्त पास होण्याचा प्रयत्न करतात. त्यातून मिळणारे ज्ञान आपल्याला काहीच गरजेचे वाटत नाही. त्यामुळे प्रदूषण अभ्यास करून हि आपण बुलेट वरून फेरफटका मारतो तर प्रदूषण चा विचार न करता शेतकरी शेतात पाणी सोडून रात्र भर झोपतो.त्यामुळेच कदाचित शिक्षित व अशिक्षित आज पर्यावरण रक्षण करण्यामध्ये एकाच रेषेत आहेत. 

            आपल्या कडे १८ वयोवर्ष असलेली व्यक्ती प्रौढ मानली जाते व अनुसरून सरकार निवडण्यामध्ये योगदान देते.पण त्याच व्यक्तीला २१ वर्ष असल्याखेरीज लग्न करता येत नाही व त्याच व्यक्तीला एखादी नोकरी मिळवण्यासाठी UG,PG करावी लागते तेव्हा वय वर्ष २४ इतके होते. म्हणजे स्वताच्या पायावर उभे न राहता हि आम्हाला सरकार उभारण्यात योगदान देता येत यावरून हेच सिद्ध होत. 

            जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायाचा असतो, तेव्हा त्याची पहिली पायरी म्हणजे ५ ते १२ वर्गाची पाठ्यपुस्तके वाचणे. म्हणजे परत एकदा शालेय वयात ज्या चुका केल्या त्या सुधारण्यासाठी वेळ द्यावा लागतो. थोडक्यात काय तर ज्ञानार्थी व्हाव लागत. मग ५ - १२ दरम्यान शालेय जीवनात विद्यार्थ्याला शाळा नंतर extra class,या साठी पालक किती तरी खर्च करतात ते हि फक्त परीक्षार्थी बनविण्यासाठी कारण आपण विद्यार्थ्याचे ज्ञान न पाहता कागद पाहतो. यामुळे एवढा वेळ आणि पैसा आपणास खर्च करावा लागतो.

            IIT सारख्या प्रतिष्ठित संस्था मध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी कमी वयात आपले सर्वस्व पणाला लावून तयारीला लागतात. पास होतात व प्रवेश हि मिळवतात पण आयुष्याच्या युद्धात लवकर अपयश पत्करून आयुष्य संपवतात. म्हणजे यात हि आपण कुठेतरी चुकत आहोत. विद्यार्थ्याला परीक्षा हेच आयुष्य नसून त्यापलीकडे भरपूर काही आहे हे आपणास शिकवता आल पाहिजे.

           १०,१२ वी नंतर पाहतो सर्व विद्यार्थी पालक नामांकित महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळावे यासाठी प्रयत्न करतात. याबद्दल काहीच आक्षेप नाही, पण पुढे ज्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही त्याला अपयशी ठरवणे हे चुकीचे आहे. जर नामांकित महाविद्यालय हेच यशाचे प्रतिक आहेत तर जिल्हा परिषद शाळा किंवा अन्य महाविद्यालये यांच्या स्थापनेचे महत्वच काय ? तसेच नामवंत महाविद्यालय मध्ये प्रवेशासाठी किमान 98 % अश्या विशिष्ट प्रकारची अट असते. जर असे असेल तर शासनाने पास होण्यासाठी ठरवून दिलेले 35% काय कामाचे. कारण जर 98 % मिळाले नसतील तर त्या महाविद्यालय च्या प्रमाणे तुम्ही नापासच आहात.पण हे एवढे % घेवून त्या महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थी यशस्वी होतात असेही नाही. 

            वरील सर्व कारणे अभ्यासता हे सांगता येईल कि खरेच आपल्या शिक्षणव्यवस्थे मध्ये दोष आहेत. पण ते आपणासच दूर करावयाचे आहेत त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना आणि पुढील पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना हीच विनंती आहे कि विद्यार्थ्याला परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवलं पाहिजे. 

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

ती.....,

              भारतामध्ये दर वर्षी प्रामुख्याने १२ लाख कर्करोग रुग्ण नोंद होते व ८ लाख रुग्ण मृत्यू पावतात. म्हणजे हि आकडेवारी पाहिलं असल्यास कोविद - १९ पेक्षा हि भयंकर आहे. यात पुरुष व महिलांचे प्रमाण समान असल्याचे दिसून येते. पण जेव्हा आपण पुरुष संबंधी विचार केला तर त्यांना कर्करोग होण्याचं मुख्य कारण व्यसन आहे. याबाबत प्रत्येक जन बोलत त्यामुळे मला त्याबद्दल न बोलता आपली विचार सरणी आणि महिला कर्करोग यावर थोडासा प्रकाश टाकावासा वाटतो. 

              घरामध्ये आई जेव्हा नाश्त्यासाठी ईडली करते,तेव्हा तिची हि खूप इच्छा असते गरम - गरम खावेत. कारण गरम इडलीच फारशी चविष्ट लागते, पण होत उलट - आई सर्वाना गरम इडली खाऊ घालते नंतर ती सर्वांचे डबे भरते यादरम्यान परिवारासाठी केलेल्या इडली उरतात व त्या थंड होतात. मग आई अन्न कशाला वातोळ करायचं म्हणून थंडच इडली खाते. तसेच आपण tv मालिका मध्ये पाहतो, जी नट असते ती सर्व परिवाराचे जेवण झाल्यानंतरच जेवण करते. मग यावरून असं दिसून येत कि आपण भौतिक रित्या आधुनिक झालेलो आहोत पण विचाराने आणखी मागास आहोत हे नक्की. 

               आता वरील उदाहरण देण्याच कारण यासंबंधी थोडी चर्चा करूया. वर म्हटल्या प्रमाणे स्त्री व पुरुषांना कर्करोग झालेली आकडेवारी हि अगदी समान आहे. मग जेव्हा विचार केला कि जास्त प्रमाणात स्त्रिया व्यसन करत नाहीत तरीही त्यांना कर्करोग चे प्रमाण पुरुष बरोबर का ? तेव्हा माझ्या काही निरीक्षणात या पुढील बाबी आलेल्या आहेत. महिलांमध्ये प्रामुख्याने ब्रेस्ट व सेर्विकल कॅन्सर चे प्रमाण जास्त आढळून येते, त्यानंतर लीप,स्टमक,लंग कॅन्सर चे प्रमाण दिसते. मग एवढे व नाना प्रकारचे कॅन्सर महिलांनाच का ? याचे थोडेसे उत्तर तुम्हाला पटतात का बघा,

               मुली वयात आल्यानंतर मासिक पाळी चालू होते. हे आपण सर्वांनाच माहित आहे पण त्यास आपण नैसर्गिक न घेता अपवित्र, किंवा अन्य काहीतरी समजतो व इथूनच खऱ्या अर्थाने कर्करोग साठी वाव मिळते. मासिक पाळी दरम्यान फक्त रक्तस्त्राव न होता एस्त्रोजन आणि प्रोजेस्त्रोन सारखे हार्मोन देखील रिलीज होतात. व मोठ्या प्रमाणात प्रोटीन, हिमोग्लोबिन चा ऱ्हास या दरम्यान होतो. यामुळेच हिमोग्लोबिन चे प्रमाण हि पुरुष व स्त्री मध्ये समान नसते. व हि मासिक पाळी ची प्रक्रिया वारंवार होत असल्याने स्त्री चे शरीर व पेशी या कर्करोगास शिकार होतात. यामुळे गर्भाशय चे कर्करोग आपणास भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येते. यावर उपचार हि आपण करू शकतो पण आपली समाज व्यवस्था मुळे स्त्री सर्व सहन करते व सर्वात जास्त झाले असता तिला उपचार मिळतो पण तेव्हा खूप वेळ होत असतो, त्यामुळे खरच मासिक पाळी वगैरे यास नैसर्गिक आहे म्हणून आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. 

               आपल्याकडे मा का दुध पिया है तो मर्द_ म्हणजेच बाळ जन्मल्या नंतर तो आईच्या दुधावर च काहीदिवस वाढतो. व नवजात शिशु चे ३०२ हाडे असतात ते पुन्हा कमी होत जातात. मग या हाडांना अतिशय पोषक बनवण्यासाठी आईचे दूष खूप महत्वाचे असते. आईंच्या दुधामधून मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम शिशु ला मिळत असते ज्यामुळे तो पुढे सशक्त होतो,मात्र आईच्या शरीरातील calcium,protein,etc. कमी होतो तसेच याच्या पूर्वी म्हणजे अर्भक असताना हि तो आई च्या शरीरावरच पूर्णता अवलंबून असतो. 

                यासर्व मुळे आईचे शरीर कमकुवत होत असते, ज्यामुळे वयाच्या ४० वर्ष पर्यंत येत असताना आईला कर्करोग अथवा अन्य त्रासास सामोरे जाववे लागते. हे असे असताना हि वरील उदाहरण प्रमाणे आई ला योग्य प्रमाणात न्यूट्रीशन मिळत नाही, ज्यामुळे तिच्या शरीराचा फक्त ऱ्हास होत असतो.

               वरील परिस्तिथी शहरात थोडीशी बेटर आहे पण ग्रामीण भागात तर खूपच वाईट आहे. ग्रामीण भागात मुलींची मोठ्या प्रमाणात घुसमट होत असते. शौचालय नसल्या कारणाने मुलीना सकाळी अगदी लवकर उठावे लागते, याचसोबत घुसमट च्या भीतीने त्या योग्य प्रमाणात जेवत हि नाहीत याचाच परिणाम न्यूट्रीशन वर होतो व पुढे शरीरातून होणारा ऱ्हास यामुळे तिची पृकृती हि खालावत असते. 

            हा शारीरिक ऱ्हास भरून काढण्यासाठी न्यूट्रीशन तर लागेलच पण आपल्या समाजाची मान्यता हि हवीय म्हणजे तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांना आपण समजून घेतलं पाहिजे कि ते सर्व नैसर्गिक आहे व यामध्ये लाजिरवाणी वगैरे बाब काहीच नाही पण आपल्या समाजाची घडण असल्यामुळे आज महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

शेवटी एवढच, विचार बदला - जग नक्की बदलेल !!!!!

- प 1 Nilewad  

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

समाज व समलिंगी आणि तृतीयपंथी

               छक्क,हिजडा,षंढ,जोगप्पा,ई. नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे असणार जो शरीर यष्टीने  पुरुष अथवा महिला पण स्वभावाने स्त्री अथवा पुरुष त्यासच आपण शुद्ध भाषेत तृतीयपंथी म्हणतो. तृतीयपंथी भारतीय समाजाचा अतिशय पूर्वी पासून हिस्सा आहेत पण आपल्या गलीछ् मानसिकतेचा शिकार झाल्याने त्यांना त्यांची लढाई आजही लढावी लागत आहे. त्याबाबतच आज थोडा आपण विचार करूया,.....

               मी,तुम्ही खूप नशीबवान आहोत...का तर आपणास आपल्या लिंग बद्दल खात्री आहे. व विशेष म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी शारीरिक आकर्षण आहे.ज्यामुळे आपण स्त्री,पुरुष या वर्गामध्ये काही न करता बायोलोजीकली विभागलेले आहोत. ज्यामुळे आपणास आपला साथीदार हा सहज मिळून जातो. पण काही क्रोमोसोमल अब्रेशन मुळे आपल्या समाजात तृतीयपंथी, समलिंगी व उभयलिंगी हि अस्तित्वात आहेत. त्यांना नैसर्गिक रित्या सम लिंगी किंवा बहुलिंगी आकर्षण असते.पण आपल्या समाजात अशा संबंधाना मान्यता नाही. मग त्यांना आपला साथीदार निवडीसाठी अतिशय सहन करावे लागते. जेव्हा बालवयात त्यांना आपण स्त्री - पुरुष नसून आपल्याला वेगळ आकर्षण आहे हे समजत त्या क्षणीच घरचे दरवाजे आपल्यासाठी बंद होतात.व तेथून चा प्रवास आपण कल्पना करू शकत नाही.भारता मध्ये २५ लाख तृतीयपंथीय आहेत व त्यातील 2 लाख हे एडस् या आजाराचे शिकार आहेत.याचे मूळ कारण हेच कि त्यांना समाज मान्यता नसल्यने त्यांनी prostitution तसेच अन्य घातक पर्यायांचा वापर केला.  

               भारतीय संविधानाच्या सरनाम्या मध्ये न्याय : सामाजिक,आर्थिक व राजकीय असा उल्लेख आहे.तसेच कलम १४ कायद्यापुढे समानता. यानुसार त्यांना समाजात हक्क मिळायला हवा पण भारतीय दंड संहितेच्या (१८६०) सेक्शन ३७७ नुसार निसर्गाच्या विरुद्ध केलेली कोणतीही क्रिया त्यास गुन्हेगार संबोधले जाईल असे १८६१ मध्ये नमूद करण्यात आले. पण याचा अर्थ समलैंगिक संबंध हे कायद्याने गुन्हा आहे हे ठरवण्याचे कार्य समाजाने केले. times of India च्या report नुसार २०१६ मध्ये भारतामध्ये १४९१ जणांना ३७७ अंतर्गत अटक करण्यात आलेली होती त्यात २०७ नाबालिक व १८ महिला यांचा समावेश होता.ज्यामुळे साहजिकच त्या सर्वांच्या मुलभूत हक्काचे हनन होत होते. 

२०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालय ने कलम २१ अंतरगत व्यक्तीचा खाजगी अधिकार असल्याचे नमूद केले व कदाचित त्यामुळेच २०१८ मध्ये सर्वोच न्यायालयाने २०१४ मधील निकाल ओवररूल करून LGBTQ समुदायास लिंग चा दर्जा मिळवून दिला. व त्या अनुषंगाने भारतीय संसदेने २०१९ मध्ये कायदा हि तयार केला. 

                आज लिंग चा दर्जा मिळून देखील त्यांना सर्व अधिकार समाजामार्फत मिळालेले अद्याप नाहीत. रेल्वे किंवा अन्य ठिकाणी पैसे मागण्यास आल्या नंतर आपण त्यांना हाकलतो किंवा अतिशय खालच्या दर्जाचे म्हणत तुच्छ् तेणे आपण त्यांच्यासोबत व्यवहार करत असतो पण घरात मूल जन्माला आल्या नंतर त्याला आशीर्वाद मात्र आपण तृतीयपंथीय कडून घेतो.... 

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

स्त्री सौंदर्य कि बंधने ?

                  अलीकडेच  वाचनात आलेलं कि तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही आपल्या प्रेदेशातील रस्ते हे अगदी महिलेच्या गाला प्रमाणे करू !!!! हे विधानैकताच कुठेतरी मनात तिरस्कार भरून आला. या पितृसत्त मानसिकते विरुद्ध त्यानिम्मिताने ....

                         पितृसत्ता म्हणजे स्त्रियांच्या अधिकारांचे हनन करून पुरुषी सत्ता समाजात गाजवणे हे आपणास व्याख्येरूपी सांगता येत. याच पितृसत्ता चा मान सदैव टिकून राहावा यासाठीच आपण स्त्रियांवर सौंदर्य रुपी बंधने घातली आहेत. ती कोणती व कशा प्रमाणे आपण पितृसत्ता टिकवून ठेवेत आहोत ते आपण पुढे थोडक्यात पाहणार आहोत.

             स्त्रियांनी केस वाढवावे त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडत असते असे आपण नेहमी दूरदर्शन तसेच अन्य ठिकाणी च्या जाहिराती मधून पाहतो पण खरे पहिले असता पितृसत्ता टिकवण्य मध्ये एखाद्या स्तीयांचे केस ओढले कि तिची ताकत हातात येतेच सोबत त्यांना आपण भिरकावु शकतो म्हणजेच केस या सौंदर्य रुपी वस्तू ने स्त्रियांना पुरुषांनी हातात ठेवले आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर बांगड्या - खरे पहिले तर आज शहरी मुली यांचा वापर फार कमी करतात पण नक्की ग्रामीण भागात आज हि वापर मोठ्या प्रमाणात होतो तर या बांगड्या न्वये आपण स्त्रियांची हाता मधील काम करण्याची ताकद कमी करत आहोत हे जाणवून येत कि नाही ? अगदीच हो कारण कोणतेही काम करत असताना त्यांना हातातील बांगड्या मुळे त्यांची काम करण्याची स्पीड अगदीच कमी होते. याच सोबत पायात देखील चैन आणि जोडवे - मान्य आहे हि एक धार्मिक बाब पण खरच त्यांनी काही फरक पडत नाही का ? जर तुम्ही आधुनिक नसाल तर नक्कीच हो पण जर कदाचित तुम्ही आधुनिक आहात तर तुमच्या पायांवर / चालण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅट वाक आहेच. यावरून तुम्ही आधुनिक असा किंवा प्राचीन स्त्रियांवर बंधने घालण्यासाठी समाज नेहमी पुढेच येत आहे. यामुळे सौंदर्य याच्या नावाखाली पुरुषी समाजाने स्त्रियांचे नखे वाढवली. त्याला पोलिश केले असता तेही सौंदर्य पण खरे पहिले तर तुमचे नखे जास्त लांब असल्याने तुमच्या हातावर नियंत्रण ठेवण्यात अगदीच मदत होते.

             मध्ययुगीन जगाचा इतिहास पहिले असता गुलाम मोठ्या प्रमाणात प्रचलित होते अगदी त्याच पद्धतीने आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये आपण पितृसत्ता टिकवण्यासाठी स्त्रियांना गुलाम केलेलं आहे अगदीच त्यांच्या हात पाया मध्ये बेड्या नाहीत पण संदर्य रुपी बेड्या - केस,नातानी,झुमका,बांगड्या,नखे,जोडवे व अन्य या सर्व महिला सशक्तीकरण मध्ये आडव्या येणारे संकट आहेत. तसेच आपण पडद्यावर एखाद्या अभिनेत्री ला पहिले असता तिने कदाचितच या सर्व वस्तू परिधान केलेल्या असतात.तरी देखील त्या सौंदर्याने परिपूर्ण असतात न...पण आपण हि मान्य केल कि स्त्री सशक्तीकरण साठी याच गोष्टी बाधा टाकत आहेत पण याच सोबत आणखी म्हणजे पुरुषांची स्त्रीयान्प्रती मानसिकता...तुम्ही एखदे वेळी हॉटेल/लॉज किंवा अन्य ठिकाणी गेले असाल तर प्रमुख्याने तुम्हाला आढळून येईरीसेपानिष्ट हे पद फक्त महिलांकडे असते,म्हनाजेच मला त्या स्त्री बद्दल किंवा त्या पद बद्दल काही म्हणायचं नाही तर फक्त एवढाच कि एखादे वेळी आपण जर कोणाची वाट पाहत असू किंवा अन्य कारणानिमित्त आपण काही क्षण तिथे बसू तर त्या स्त्रीचे आपण सौंदर्य दर्शन करावे हे अगदीच चुकीचे, म्हणजे पुरुष एखद्या स्त्री चे संदर्य हे करमणुकीचे साधन म्हणून आपण सर्वांपुढे सदर करत असतो. 

               अशा प्रकारच्या अनेक मानसिकता आपल्या समाजात आहेत त्या सर्व मानसिकते वर आपण सर्वांनी मिळून विजय मिळवला पाहिजे तेव्हाच कदाचित आपण स्त्री पुरुष समानता झाली हे ठाम पाने म्हणू शकतो.

गुरुवार, ३० जुलै, २०२०

कौमार्य / Virginity

पुरुष प्रेम देतो शरीरासाठी
स्त्री शरीर देते प्रेमासाठी 
           या वाक्यतून पुरुष-प्रधान संस्कृती ल नक्कीच ठेच लागली असेल. पण करणार काय,आज वास्तव हेच आहे....
आपली संस्कृती बदलत आहे. पेहराव,राहणीमान,दृष्टीकोण बदलत आहेत.हे स्वागतार्ह आहे....पण याच सोबत आपले विचार,आचार,रूढी,परंपरा बदलत नाहीत याची खंत आहे.... त्यापैकीच एक कौमार्य / verginity ही एक आहे.ज्यामुळे एका स्त्री ला मानसिक त्रासास सामोरे जावे लागते.कौमार्य विषयी ग्रामीण व शहरी भागात विविध संकटांना मुलींना सामोरे जावे लागते.....
  
            आपल्या पैकी बर्‍याच जणांना कौमार्य हा शब्द माहीत नसला तरी verginity हा शब्द नक्कीच माहिती आहे कारण एखाद्या मुली संदर्भात मुलांमध्ये विषय निघल्यास जास्त याचीच चर्चा होते व आपल्या सर्वांचा आवडता curious असलेला हा विषय आहे. त्यामुळे नक्कीच याविषयी सर्वांना माहिती आहे. तरी कौमार्य म्हणजे - एखाद्या व्यक्तीने यापूर्वी कधीच शारीरिक संभोग केलेला नाही असा होतो. हा छोटासा शब्द स्त्रीयांचे चरित्र ठरवत असतो.जर कौमार्य शाश्वत असेल तर ती मुलगी चारित्र्यवान अन्यथा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो.

          आज आपण आधुनिक युगात राहतो म्हणजे थोड्या फार प्रमाणात स्त्री-पुरुष समानता आहे.त्यामुळे एखादी मुलगी लग्न पूर्वी आपल्या प्रेमी सोबत शारीरिक होऊ शकते.ज्यान्वये कौमार्य लोप होऊ शकतो. पण तिने शारीरिक झाली म्हणून तिला चरित्रहीन कस काय म्हणता येईल. कारण तेच कृत्य पुरुषाने केल तर त्याला समाज मान्यता आहे पण स्त्रियांना मान्यता नाही.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चा दहन केला पण आज आणखी आपण त्याला आपल्या मनात बाळगत आहोत हे यातून प्रकर्षाने दिसून येतो.व याचा परिणाम मुलींच्या आयुष्यावर फार मोठ्या प्रमानात होतो. 

              अलीकडे आपल्या संस्कृती मध्ये live in relationship ही प्रेमी युगुलांची प्रथा फार मोठ्या गाजत आहे.यामध्ये असत तर काय? तर एखाद प्रेमी जोडप लग्ना आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी एकत्र राहतात.या प्रथेचे स्वागत आहेच....पण एखादी  वेळेस एकत्र राहण्याच्या भावनेतून आणि प्रेमी संबंधातून मुलगा आणि मुलगी शारीरिक होतात.यात ही काही दोष नाही. पण जेव्हा तो मुलगा त्या मुलीला सोडून जातो तेव्हा तिच्याकडे आत्महत्या किंवा वेश्या व्यवसाय या शिवाय दूसरा पर्याय कोणता नसतो. कारण समाज मान्यता देत नाही. त्यानंतर त्या मुलीने जरी दुसर्‍या व्यक्तीशी लग्न  केले तरी ती मानसिकरीत्या पूर्णता तयार नसते,तिने ज्याच्यावर प्रेम केलेलं होत त्याला ती सर्वस्व दिलेल असत. यात कौमार्य चाचणी सारख्या कुप्रथा यांनी तर तिचे जीवन पूर्णता नर्क बनते. 
तर हा उल्लेख फक्त live in relationship संदर्भात नाही तर आपल्याकडे पोराड वयात जे प्रेम होत त्यासंदर्भात ही आहेच. त्या वयात फक्त या विषयाची curiosity असते त्यातून त्याविषयी वाट्टेल ते ज्ञान मिळवण्याचा जिवापाड प्रयत्न करतो. अन त्यातच शरीराची वाढ होत असल्याने विरूद्ध लिंगी आकर्षण मोठ्या प्रमाणात होते.व शारीरिक मुला - मुलींमद्धे पुरेशी समज नसल्याने शारीरिक संभोग म्हणजेच प्रेम करणे असा अर्थ लावून त्या वाटेकडे ते वळतात. 
व पुन्हा चूक लक्षात येता आणि समाज यांना सामोरे जाण्याच्या भीतीने मुलींकडे आत्महत्या करणे हाच एक पर्याय असतो.कारण समाज स्त्री कडे फक्त एक वस्तु म्हणून पाहतो. व ती वस्तु त्यास कोरी कर-करीत लागते......यामुळे अशा स्थिति मधून जाणार्‍या बहुतांश मुली अयोग्य मार्गावर जात असल्याचे आपणास दिसून येते. त्यामुळे बाबांनो प्रेम करा.... त्यास पूर्ण पाठिंबा आहे,पण थोड प्रेमाची व्याख्या अगोदर बदला जेणेकरून एखाद्या मुलीचे जीवन उध्वस्त होणार नाही.....
             
            याच सोबत आजच्या शतकात ही काही कौमार्य संबंधी कुप्रथा आपल्या भारत देशात च काय तर जगभरात आहेत फक्त नावे वेगवेगळी आहेत...कौमार्य चाचणी,verginity test,red apple test,two finger test. ई. 
यापैकी भारतात कौमार्य चाचणी आहे जिच्यामुळे आजही समाजात स्त्री ला वाळीत टाकले जाते ज्यामुळे ती आत्महत्या करते. 

स्वतंत्र भारतात एकविसाव्या शतकात कंजारभाट समाजात स्त्री 'व्यभिचारी' आहे की नाही, हे ठरवणारी कौमार्य चाचणी लग्नानंतर घेतली जाते.व अरेंज मॅरेज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही कौमार्य चाचणी द्यावी लागते. कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. जग कितीजरी पुढे गेले असले तरी अजुनही काही समाज आपल्या प्रथांमध्ये घुटमळत आहेत. त्यांच्या या घुटमळीत कुठेतरी मुलींच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार मांडला जातोय हे नक्की.लग्नाच्या पहिल्या रात्री केली जाणारी ही कौमार्य चाचणी! लग्न झालं की त्या रात्री पती पांढरीशुभ्र चादर घेऊन  नववधू असलेल्या खोलीत जातो. बिछान्यावर ही चादर पसरली जाते. शरीरसंबंध झाला की त्या चादरीवर रक्ताचा डाग पडणं सक्तीचं. (ते झालं नाही की ती 'नव वधू' खोटी.) जे काही असेल ते घेऊन तो नवरा मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीच्या बाहेर येतो. पंच मंडळी निवाड्याला बसलेलीच असतात. ते विचारतात, ‘रात्री जो माल तुला दिला होता, तो कसा? खरा की खोटा?’ इतक्या गलिच्छ भाषेत एका स्त्री चा म्हणजेच नव्या नवरीचा अपमान केला जातोय. अशा प्रकारे कौमार्य चाचणी केली जाते. त्यात वधू आणि वर चा पूर्ण खासगीपणा पायदळी तुडवला जातो. आन जर डाग आढळला नाही तर ती चारित्र्यहीन समजून त्रास दिला जातो. किंवा घटस्फोट घेतला जातो. पण ते ही इतके सोपे नाही कारण त्या स्त्री ला पूर्णता वाळीत टाकण्यात येत.चारित्र्याहीन हा टॅग ही दिला जातोच. यामुळे साहजिकच त्या स्त्री पुढे कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने ती आत्महत्या करण्यास योग्य मानते व या बांधील समजपासून आपले जीवन संपवते. या अशा  अगदी क्षुल्लक शारिरीक चाचणीचा बाऊ करुन किरकोळ निकषावर हे लोक मुलींना आरोपी का ठरवतात तेच कळत नाही. उच्चशिक्षीत वर्गातही 'आर यु व्हर्जिन' असे प्रश्न मुलीला विचारले जातात ही देखील एक गंभीर बाब आहे. 

मुळात ही जी पद्धत आहे ती विज्ञानाच्या निकषावर रास्त आहे कारण यौनपडदा फाटण्यासाठी अनेक कारणे आहेत. नियमीत व्यायाम, योग, सायकलिंग, ट्रेकिंगमुळे कधी-कधी यौनपडद्याला इजा होऊ शकते. तसेच यासोबत जंतुसंसर्गामुळेही यौनपडद्यावर परिणाम होत असतो. मुलीचे खेळणे, अपघातही त्याला कारणीभूत असू शकतात. मात्र समाजातील बुरसटलेल्या वृत्तीच्या लोकांना ही कारणे पटत नाही. कारण अजुनही समजाच्या मनात स्त्री दुय्यम स्थानी आहे. अजुनही अशा प्रथांमध्ये समाज घुटमळत असल्याचे चित्र पाहायला मिळते. 

१९९६ साली कौमार्य चाचणीविरोधात कृष्णा इंद्रेकर आणि अरुणा इंद्रेकर या कंजारभाट समाजातल्या जोडप्याने आवाज उठवला होता. पण त्याचा परिणाम अधिक झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. ही प्रथा केवळ महाराष्ट्रातच नसून अन्य राज्यातदेखील आहे. राजस्थानमध्ये ही प्रथा ‘कुकरी प्रथा’ म्हणून ओळखली जाते. . राजस्थानात वास्तव्य करणाऱ्या ‘सांसी’ समाजात ही कुप्रथा कायम असून आजही या विकृतीमुळे अनेक तरुण मुलींना त्रास भोगावा लागतो.

               यामुळे आता खरी गरज आहे आपण जागे होण्याची, किती दिवस या अशा कारणाने आपण स्त्रियांचं जीव घेणार.व आपमन्स्पद वागणूक त्यांना देणार..... पुरे झाला रे हा लज्जास्पद खेळ. त्यामुळे समाज बदलण्यासाठी आजच आहे ती योग्य वेळ....... 

          मान्य आहे मलाही की ही प्रथा पूर्ण समाज अस्तीत्वात आल्या पासून ची आहे मग एका रात्री तुन अथवा असे लिहिल्याने जाणार नाही,पण आपल्या समाजात काय होत आहे या कुपर्थांचा आपण थोडा विचार केलाच पाहिजे,ज्यातून पुढे समाज प्रबोधन होऊन एखाद्या मुलीचे प्राण वाचवता येतील त्या उद्देशाने हे लिखाण करण गरजेचं......

       शेवटी जाता जाता,

                         खरच प्रेमाची व्याख्या तुम्ही बदलू नका,

                                      प्रेम ही एक सुंदर भावना आहे..... 

                                                 जेव्हा प्रेम होईल तेव्हा जगाचा विसर पडून संपूर्ण जग सुंदर भासेल.......



- प 1 निलेवाड 

बुधवार, २९ जुलै, २०२०

स्क्रीन आणि नैराश्य....

            अलीकडेच अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली व आठवडा भर मित्र-परिवार यांचे काळजी वाहू फोन चालू झाले. त्यामुळे डिप्रेशन स्ट्रैस यासारख्या गोष्टींवर चर्चा जोरात चालू झाली. त्यापैकीच मी ही त्यासंबंधी थोड लिहू इच्छितो...... खरे पाहता सुदैवाने माझा मित्र परिवार चांगला कारण ज्याक्षणी मला नैराश्य वाटू लागलं तेव्हा अगोदर मी कॉल करून बोललो.व त्यांनीही माझ्या परिस्थिति वर न हसता बोलून साथ दिला.त्यामुळे त्याव्यक्ति च सर्व प्रथम धन्यवाद.
       
        आजचे युग तंत्रज्ञान चे युग म्हणून ओळखले जाते व मानव हा समाज शील प्राणी आहे हे सर्वांना माहीतच आहे त्यामुळे थोड बोर वाटत असेल पण यावर आपण कधी विचार नाही केला. या युगात reality ची जागा ही स्क्रीन ने घेतली आहे.त्यामुळे मैदानी खेळ,मित्र,कार्यालये,काम हे सर्व एका स्क्रीन च्या माध्यमात गेले. त्यामुळे लोकांचा सहवास कमी झाला व स्क्रीन वर दिसणारे आभासी जग हे आपणा सर्वांचे जग,दुनिया झाली. मग आता त्या आभासी दुनियेत आपण किती भारी आहोत हे सर्वांना दाखवण्यासाठी आपली स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत विजेता कोण हे आपण स्वतच ठरवत असतो ते ही स्क्रीन वर पाहून यामुळे डिप्रेशन स्ट्रैस यासारक्या गोष्टी आज युवा पिढी मध्ये कॉमन झालेल्या आहेत.त्यामुळे मला स्ट्रैस येत  मी दुसर्‍यांसारखा सामान्य नाही असा काही एक नुनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही.फक्त तो होऊ नये याची खबरदारी सर्वांनी नक्की घ्यायला हवी.
            आज आपल्या पैकी बहुतेक जन म्हणजे त्यात मीही आलोच, त्यामुळे आपण सर्व जन व्हाट्सप्प,फेसबूक,इंस्तग्राम,ट्वीटर,स्ंनेपचॅट ई. सोशल मीडिया वर आपली जी सर्वात भारी फोटो आहे तीच पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो,व आपण इंग्लिश मध्ये नापास असूनही अतिशय फ्क्लुएंत इंग्लिश मध्ये त्यात टिप्पणी टाकतो. हे करत असताना पुढच्या व्यक्ति विषयी आपल्या मनात काहीही नसतं,फक्त असतो तो म्हणजे मी किती भारी आहे हे दाखवून देण्याचा उद्देश. व यातूनच पुढे तुलना होण्यास सुरुवात होते ती पुढे नैराश्य रूप धरण करते व व्यक्ति ल अतिशय टोकाचे पाऊल घेण्यास प्रवत्त करते.बर तो पाऊल घेतल्याने काही आपली परिस्थिति सुधारणा होणार आहे का तर बिलकुल नाही....यामुळे स्क्रीन व आभासी जग हे फक्त बाहेरून दिसण्यास फार सुंदर आहेत पण आत मध्ये काहीच नाही. म्हणून म्हणतात न दिसते तसे नसते म्हणून जग फसते.
           
             स्क्रीन अथवा आभासी जग याविषयी आपण बोलतो तेव्हा ऑनलाइन प्रेम याविषयी न बोलणे म्हणजे न्याय होणार नाही त्यामुळे याविषयी थोडसं....आज आपण फेसबूक किंवा अन्य सोशल मीडिया माध्यमातून जगातील नव-नवीन मित्रांशी संवाद साधतो,त्यापैकि विरूद्ध लिंगी कोणी असेल तर ती चर्चा नक्कीच फार रंगते. व त्यातून आपणास खूप आनंद मिळतो.वाटत आपणाला ओळखणार कोणी तरी या जगात आहे अस वाटून आपण ती चर्चा तिथेच न थांबवता फार पुढे घेऊन जातो. व पुन्हा ते आपणास त्या व्यक्तिला बोलण्याच व्यसन लागून जात व आपण नादान त्यालाच न पाहिलेलं प्रेम समजून आशिक होऊन बसतो.मात्र पुन्हा जेव्हा ती व्यक्ति कोन आहे किंवा आपल्या व्यसनी प्रेमाला नकार आला तेव्हा आपण नैराश्य च्या सागरात छिद्र पडलेली जहाज होऊन तरंगत असतो. त्यामुळे स्क्रीन म्हणजे सर्व विश्व आहे हे चुकीचे......उद्या त्या नैराश्य रूपी सागरात तुम्ही संपूर्ण डुबल तेव्हा वास्तविक विश्व हेच त्यातून बाहेर येण्यास मदत करेल,त्यामुळे जरी आभासी दुनियेतील मित्रांचे बादशाह तुम्ही असाल तरी वास्तविक जीवनात एक गंगू मित्र नक्की सोबत ठेवा,कारण आभासी जीवन आज आहे उद्या नाही तेव्हा वास्तविक जीवनातील गंगू तूम्हाला परत एकदा पायावर थांबण्यास मदत करेल.......

     समजा आपल्या भारत स्वतंत्र लढा दरम्यान स्क्रीन अस्तीत्वात असती तर आपला लढा यशस्वी झाला असतं का?  की आपण आजही पारतंत्र्यात असतो?
माझ्यामते नक्कीच आपण आजही पारतंत्र्यात असतो व दुसर्‍यांच्या आयुष्याची आपणास काहीच किमत नसती मग राष्ट्रवाद तर फार दूर......
           अमेरिकन क्रांति,फ्रेंच क्रांति किंवा आपला भारतीय स्वातंत्र्य लढा हा मुख्यता मिडल क्लास लोकांनी लढवला आहे,कारण श्रीमंत लोकांना अन्याया ची झळ ही बसत नाही,गरीब वर्गाला स्वताच पोट कस भरेल याची चिंता असते त्यामुळे तो देखील अन्याय विरोधात लढा देण्यास समोर येत नाहीत. त्यामुळे जगातील मुख्य क्रांति असो आथवा आपला स्वातंत्र्य लढा त्यात मुख्य योगदान हे मिडल क्लास चे असलेले दिसून येते.19 - 20 शतकात भारतात फक्त 40 लाख एवढा वर्ग हा मिडल क्लास होता असे सांगता येत व आज पाहता त्याची संख्या वाढून 40 करोड इतकी नक्कीच झाली असेल.मग आज भारतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पण हातात असणार्‍या स्क्रीन मुळे सामान्य माणूस देखील क्रांति करण्या पासून अडवला जातो. तो त्याचे कर्तव्य एवढच समजतो की फोटो / विडियो फॉरवर्ड केला म्हणजे आपल कर्तव्य संपलं. या अशा मुळे आपण खरच स्वतंत्र न होता आणखी मागे राहिलो असतो.

शेवटी.....
            आज आपण जे स्क्रीन वर पाहतो,ऐकतो किंवा त्यात सहभाग घेऊन योगदान देतो ते कितपत खरे आहे याचे फक्त त्याच व्यक्तिला माहीत असते.ज्या पद्धतीने प्रतेक व्यक्तीच्या दोन कहाणी असतात एक जी तो जगाला दाखवतो व दुसरी जी तो जगापासून लपवून ठेवतो अगदी त्याच पद्धतीने आभासी जग आणि वास्तविक जग यातील जीवन आहे.... यामुळे तुलना न करता निराश न होता वास्तविक जगायला शिका व जीवनाचा आनंद घ्या.....


- प 1 निलेवाड 

शनिवार, ६ जून, २०२०

स्त्रीत्व

आज वाचत असताना संदर्भ आला की बांझ क्या जाने प्रसव पीडा  वाचल्यानंतर मला
 ही त्यात काही मोठी बाब वाटली नाही पण थोड मंथन केल्यानंतर मला आठवलं की समाजात एखाद्या स्त्री ल स्त्रीत्व हे अपत्य प्राप्ती नंतर प्राप्त होते व जर का काही कारणास्तव स्त्री ला अपत्य प्राप्ती झाली नाही तर समाजात तिला पुरता मान नसतो,तिला अशुभ मानण्यात येत व एखाद्या शुभ कार्यक्रम मध्ये सहभागी करून घेत नाहीत याचे ऊत्तम उदाहरण - अलीकडे प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा "लय भारी" त्या मध्ये चित्रपटच्या सुरुवातीलाच याबाबत चा संदर्भ आलेला आपणास पाहावयास मिळतो, पण हे खरोखरच योग्य आहे का?

       प्रत्येक स्त्री ला  संतती प्राप्ती बद्दल ची ईच्छा असते. आपल्या पाल्याचे पालन पोषण करणे.तसेच त्याला जगातील प्रतेक सुख देऊन अतिशय आनंदात त्यास वाढवावे या सर्व साखर स्वप्ना मध्ये स्त्री गर्भधारणा व प्रसूती वेळी प्रसूती वेदना सहन करते.यामुळेच प्रसूती वेदना ही एक स्त्री साठी अतिशय गौरवाची गोष्ट असते.पण नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणा मुळे संतती प्राप्ती होत नसेल तर साहजिकच ती स्त्री मानसिक त्रासातून जीवन जगत असते व त्यात सामाजिक दूषणे यामुळे तर त्या स्त्री चे जीवन अतिशय खडतर होते यात शंका नाही.तेव्हा अशा वेळी त्या स्त्री ला बळ देन हे घरातील प्रतेकाच कर्तव्य आहे.पण आपल्या कडे परिस्तिथी उलटिच. एखाद्या नवीन जोडप्याच लग्न झाल असता आई वडिलांची फार इच्छा असते की नात वांची तोंड पहावीत म्हणजे मरण्यास मोकळं अस विचार करतात व जोडप्यांवर अपेक्षा चे भंडार उभारतात. खरे पाहता त्यांची इच्छा ही योग्यच आहे पण याच इछापूर्ती साठी वाटेल ते करण्यास तयार असतात. व जर का त्या स्त्री ला संतती प्राप्ती होत नसेल तर तिला घरातूनच सर्वप्रथम दूषणे देण्यास सुरुवात होते.
         समाज ही सर्व प्रथम स्त्री ला दोष देण्यात पुढाकार घेतो कारण पुरुषप्रधान संस्कृती न. यास्तव समाजातील दूषणे आणि आई वडिलांची इच्छा यातून पुरुष ही अपत्य प्राप्ती का होत नाही याचे योग्य कारण न पाहता दूसरा विवाह करतो. अन नाविलाजाने त्या स्त्री ला सर्व काही सहन कराव लागत.अशा मनस्तीथी वेळी स्त्री ला निदान आपल्या जीवनसाथी चा सहयोग अपेक्षित असतो कारण लग्न समारंभात त्यांनी आयुष्यातील प्रतेक क्षणी साथ देईन याची गाठ बांधतात. पण काही दिवसातच ही परिस्तिथी उद्भवेल तर खूप वाईट आहे.
       
        खरे पाहता समाजाचे आणि पुरुषाचे खूप काही चुकत आहे अस मला वाटत
   स्त्री ला स्त्रीत्व प्राप्त करण्यासाठी माता बनणे हे अतिशय आवश्यक आहे व जर का स्त्री ला मातृत्व प्राप्त झाले तर ती शुभ पण एरवी मातृत्व आणि गर्भधारणा या मधील मासिक पाळी यास सर्व जन अशुभ मानतात. माझ्या मते सर्वांना याबद्दल कल्पना आहे , मग त्यावर योग्य चर्चा करायला,त्याबद्दल योग्य माहिती देण्यासाठी,त्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यावर योग्य ती चर्चा का होत नाही? आता या विषयावर थोड लिहिताना भीती आहेच कारण समोर जरि कौतुक झाल पण हा काय विषय आहे का लिहायचा? अस माझ्या मित्रांच्या मनात येईल. कारण त्यांच्यासाठी मासिक पाळी हा विषय मजाक किंवा अपवित्र आहे. व कदाचित यामुळेच स्त्री ला अजूनही कमकुवत आणि दुय्यम वागणूक पुरुषी मानसिकते कडून दिली जाते.
            मासिक पाळीला राजस्वला असही म्हणतात. या दोन्ही संकल्पना मुळात स्त्री च्या मातृत्व संबधी आहेत. म्हणजेच ज्या गोष्टीच्या आधारे स्त्री ला मातृत्व प्राप्ती होते. जेव्हा मानवाच्या रूपात परमेश्वराने अवतार धारण केले मग ते देवकीच्या पोटी श्रीकृष्ण किंवा कौसलेच्या पोटी श्रीराम असो त्यांना जन्म घेण्यासाठी आईच्या गर्भाशयाची गरज भासलीच न! मग जी स्टीथी नवनिर्माणशी, मातृत्वशी संबधित आहे ती अपवित्र कशी काय असू शकते?
        आपण विज्ञान च्या सहाय्याने समजून घेतले असता स्त्री च्या शरीरामध्ये प्रत्येक महिन्याला एक आर्तव जमा होतो.याचा उपयोग गर्भधारणेसाठी होतो. नऊ महीने यावरच गर्भाचे पालन पोषण होते,पण इतर वेळी या आर्तव (रक्ताचा ) उपयोग होत नाही म्हणून ते महिन्याच्या ठराविक दिवसामध्ये बाहेर पडत. यालाच रजस्वला म्हणतात. व ही अगदी नैसर्गिक क्रिया आहे. जस पचनसंस्था, श्वासोछवास ह्या जशा आहेत अगदी तशाच. मग पाळीला अशुद्ध मानण्याचे कारण काय ? जेव्हा एखाद्या स्त्री ला बाळ होत तेव्हा कुणीच अस म्हणत नाही हे अशुद्ध रक्तपसून तयार झालेल आहे म्हणून.तेव्हा तर त्या स्त्री ची ओटी भरली जाते, मग एकाच गोष्टी साठी एकाच स्त्री ला एवढी विसंगत वागणूक का? जरी ही रूढी परंपरा असली तरी त्या परंपरा पुरातन काळात परिस्तिथी वर अवलंबून होत्या. आता काळ बदलला आहे तर विचार सारणी ही बदलली पाहिजेच.कारण काळाबरोबर गरजा ही बदलत असतात व आज विचार परिवर्तनाचीच  गरज आहे.
             घराला वारस किंवा मुलगा हवा या अशा परिस्थितीनं स्त्री ला बळी न ठरवता त्यावेळी तिला मानसिक बळ देणे हेच महत्वाचे आहे. आणि मात्रत्व हे जगातल सगळ्यात मोठ वरदान आहे, त्याला विटाळ बनवू नका,मासिक पाळी स्त्री ला पूर्णत्वास नेते, ती अशुद्ध असूच शकत नाही. अर्थातच हे परिवर्तन लगेच घडून येणार नाही, कारण वर्षानुवर्षे चालत आलेल्या या रूढी चा पगडाच तेवढा जास्त आहे. आणि मी सुधा त्याच समाज व्यवस्थेचा भाग आहे, पण आपण बदल घडवू शकतो.हे मला कळतय तर मी मानसिकता बदलवत आहे,......

शनिवार, ३० मे, २०२०

रिवर्स मायग्रेशन

“हम मेहनतकश जगवालों से जब अपना हिस्सा मांगेंगे।
इक खेत नहीं, इक देश नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे।।”

फैज़ अहमद फैज़ यांनी आपल्या साहित्यातील ओळ्यांमधून मजदूर वर्गास सन्मान मिळवून देण्याचा त्यासोबतच त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे.खरे पाहता प्रतेक राजकीय पक्ष हा मजदूर वर्गाचे हक्क लढण्याच्या हेतूनेच स्थापन झालेला आपणास पाहावयास मिळतो.प्रत्येक पक्षाच्या घोषणा पत्रामध्ये मजदूर व तळा गाळातील लोकांच्या हितासाठी कार्य करणे हाच अजेंडा असतो.पण जेव्हा खर्‍या अर्थाने जमिनी स्तरावर मजदूर किंवा त्या लोकांसाठी काम करण्याची वेळ येते तेव्हा मात्र सर्व जन आपले हात वर करतात.असच काही भारतात कोरोंना (कोविड-19) विषाणू संदर्भात देशव्यापी लोकडाउन परिस्थितीत मजदूर यांच्या परिस्थिति विषयी झालेले आपणास दिसून येते.म्हणजेच मजुरांना मोठ्या प्रमाणात स्थलांतर याच्याशी दोन हात करावे लागत आहेत.व लॉक डाउन दरम्यान होणारे स्थलांतर हे प्रामुख्याने सामान्य परिस्थितील स्थलांतर पेक्षा पूर्णता उलट आहे.रोजगार,दर्जेदार जीवन या अशा कारणांमुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते.परंतु आज शहरा कडून ग्रामीण भागाकडे स्थलांतर होत आहे. व ही चिंताजनक बाब होय.यालाच तज्ञांनी रिवर्स मायग्रेशन असे संबोधिले आहेत.
22 मार्च पासून उद्योग,कारखाने त्याबरोबरच अन्य व्यवसाय बंद झाल्याने मजदूर वर्गाला लॉक डाउन चा मोठा फटका बसला.त्यांचे पोट हे दिवसात केलेल्या कामावर अवलंबून असल्याने ते पूर्णता पर्यायहीन झाले.यातच त्यांच्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कुटुंब योजना द्वारे त्यांना मदत केली.याचबरोबर त्यांच्या साथी रेशन ही उपलब्ध करून दिले.पण दिवसेंदिवस कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव पाहता व त्यावर कोणताही उपचार उपलब्ध नसल्याने लॉक डाउन वाढत चालला.दरम्यान महानगर किंवा शहरी वास्तव्यास विना उत्पन्न राहणे हे कोणासही परवडत नाही.त्यामुळे मजूर वर्गाकडून दिवसेंदिवस प्रवासाची मागणी वाढू लागली.(यावरून एक सिंघम चित्रपटातील संवाद आठवला "गांव जाउंगा मेहनत करूंगा") कारण मजुरांना गावात किमान पोट तरी भरता येईल व परिवारा समवेत हा काळ घालवता येईल.

मजूर वर्गाचे स्थलांतर - 
  • हा संघ असंघटित असल्याने यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो, म्हणून ते रोजगार च्या शोधात, आपले जीवन मान उंचावण्यासाठी याबरोबरच काही व्यक्तींची परिस्तिथी अत्यंत हालाकीची असल्याने ते गाव सोडल्याशिवाय काही होणार नाही यामुळे ते शहरा कडे स्थलांतर करतात.
  • प्रत्येक गोष्टीला मोठ्या व सुंदर गोष्टीचे आकर्षण असते. यातून च काही जन शहरी भागातील आकर्षण ने आपले गाव सोडून शहरात येतात दरम्यान ते शहरात मजदूरी करतात व गावातील पेक्षा साहजिकच जास्त ते उत्पन्न मिळवत असतात.यातून त्यांच्या राहणीमनचा दर्जा सुधारतो व त्यामुळे दुसर्‍या ना ही शहराचे आकर्षण होत असते. 
  • काही जन ग्रामीण भागात पाल्याचे भविष्य नाही हे ओळखून शहरात स्थलांतर करतात व मिळेल ते काम करतात.

या अशा विविध कारणांमुळे मजदूर वर्ग प्रामुख्याने स्थलांतर करतो व हा वर्ग असंघटित असल्या कारणाने आपणास योग्य आकडेवारी सांगता येत नाही. पण लॉक डाउन दरम्यान आर्थिक घडी पूर्णता ढासळल्याने त्यांना गावाकडे परत जाण्या ऐवजी दूसरा मार्ग नव्हता यामुळेच केंद्र सरकारने स्ती थी लक्षात घेऊन 1 मे म्हणजेच जागतिक कामगार दिन दिवशी सर्व कामगार मजुरांना गावी जाण्यासाठि विशेष रेल्वे सेवा "श्रमिक स्पेशल ट्रेन" ची घोषणा केली.पण नियम व अटी यामुळे त्यांना आणखी जास्त संकटांना सामोरे जावे लागले. त्या समस्या पाहत केंद्र सरकार आपले हात वर उचलत सर्व जबाबदारी ही राज्य सरकार वर थोपवण्यात आली. तरी राज्य सरकारने ही जबाबदारी स्वीकारून योग्य पद्धतीने श्रमिकांना तर बस किंवा रेल्वे ने त्यांच्या मूळ स्थानी पाठवण्यास सुरुवात केली. पण तरी मजदूरांची स्टीठी दयनीय च!!!!!!

            आपण दिवसेंदिवस पाहत आहोत की श्रमिक स्पेशल ट्रेन सुरुवात असून ही लोक पायी सायकल किंवा अन्य साधनातून प्रवास करत आहेत.व त्यांच्या जीवाला त्यांना मुकाव लागत आहे,मग खरेच का सरकार अपयशी ठरत आहे की राजकारण करत आहे ?
आज अभिनेता सोनू सूद हा श्रमिकणा त्यांच्या घरी जाण्यास मदत करून सरकार पेक्षा ही योग्य काम करत आहे. मग शेवटी सरकार का अपयशी? सरकार कडे तर पुरेशी साधने आहेत,
बर मान्य आहे सांघिय व्यवस्था आहे आपल्या देशाची पण तरी अशा आपत्कालीन स्टीथी मध्ये एकीय व्यवस्थेने कार्य करण्यास हव.जेणेकरून श्रमिकांचे प्रश्न लवकर सुटतील व त्यांच्या अवैध रित्या प्रवासामुळे त्यांना धोका निर्मान् होणार नाही.
बर जाऊदेत, सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन ची सुविधा पुरविली खरी पण त्यातील मूलभूत गरजांच काय ? श्रमिक रेल्वे ने प्रवास करणार्‍या मजूयारांना जेवण,पाणी किंवा अन्य कोणत्याच सुविधा देण्यात येत नाहीत,व सर्व देशव्यापी लॉक डाउन सुरू असल्याने फेरेवाळे किंवा अन्य कुठून त्यांना ती सुविधा मिळणार नाही ना? याचा नक्कीच सरकारने विचार करावयास हवा... व खरे पाहता या श्रमिक ट्रेन सुविधे अभावी चालत असल्याने प्रवाश्यांच्या सोशल distancing ला पूर्णता फज्जा उडविली जात आहे व यातून प्रवास करणे म्हणजे देखील जीवाशी खेळल्या सारखे आहे.बरोबरच एक श्रमिक ट्रेन सुविधे अभावी धावते ठीक आहे पण योग्य वेळी योग्य ठिकाणी तरी निदान पोहोचली पाहिजे,आपण बातम्या मध्ये ऐकून असाल याबाबतीत,पण हद्द तेव्हा होते ज्यवेळी एखादी रेल्वे आपल्या योग्य स्थळी 9 व्या दिवशी पोहोचते. खरे पाहता 9 दिवस असे राहणे म्हणजे आपण मजूरांच्या जीवाशी खेळत आहोत नाही का ? 
अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार ने योग्य ती मदत सर्व मजूर वर्गाला करावयास हवी जेणे करून त्यांच्या ही हक्काचे संरक्षण होईल सोबतच राज्याचा व देशाचा विकास घडण्यात मदत होईल कारण रिवर्स मायग्रेशन मुळे लॉक डाउन उठल्या नंतर सर्व राज्यांना व देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा फटका बसणार आहे, बेरोजगारी ची स्टीथी तर आहेच पण कामासाठी मजूर वर्ग कमी पडेल व परिणामी कर व्यवस्था, उत्पादन , उपभोग अशा सर्व गोष्टींवर मोठा परिणाम होईल. यामुळे राज्य व केंद्र शासनाने श्रमिकांना योग्य ती मदत पुरवायला हवी कारण आजही वेळ गेलेली नाही.
आता स्थलांतरित झालेल्या मजूर वर्गाला बेरोजगारी चा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागेल त्यामुळे सरकारने मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून द्यावयास हवेत,सोबतच मजुरांच्या मूलभूत गरजा पैकी एक रेशन असल्याने तो वेळेवर आणि कमी नियमा न्वये उपलब्ध करून देऊन मजूर वर्गास समाजाचा एक घटक म्हणून मान्यता द्यायला हवी. 
आजचा ब्लॉग हा थोडा राजकीय जरी झालेला असला तरी हीच परिस्थिति आहे व मजुरांच्या बाबतीतील हक्क सुरक्षित राहावे यासाठी भारतीय मानवी हक्क आयोगाने केंद्र सरकारला नोटिस ही बजावली आहेच....
शेवटी लोकशाहीर अन्ना भाऊ साठे यांचं वाक्य आठवत ,"पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर तोललेली नसून, कष्ट करणार्‍या मजुरांच्या हातावर तोललेली आहे” 


                                                                                                 - प 1 निलेवाड 

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

वृद्धाश्रम

           आई वडील म्हणजे मला भूक लागली पासून,तुम्हाला स्वता करून खाता येत नाही का पर्यंतचा प्रवास..
           आई वडील म्हणजे तुम्ही माझ्या मनात राहता पासून,तुम्हाला वृद्धाश्रमात राहावे लागेल पर्यंतचा प्रवास.. अशी परिभाषा आधुनिक समाजाची बनत आहे.. 
             वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच नवीन तरुणाईला प्रश्न पडतो जर वृद्धश्रम ही वाईट बाब तर याची निर्मितीच का झाली असेल?
             म्हणतात म्हातारपण हे दुसरे बालपण असत,पण खरच या बालपणाला दुसरी आई कुठून आणायची ? हा प्रश्न आजच्या आधुनिक तरुण वर्गाला पडतो व उत्तर म्हणून ते वृद्धाश्रम......आहेच.
         ज्याप्रमाणे अनाथ आश्रम निर्माण करण्यामागे खरेतर खूप लोकांनी विचार केला असेल. अशी मूल जी एकाकी जीवन जगतात,ज्या मुलांचे आईवडील अपघातात मरतात आणि त्यांचे नातेवाईक एका अवाजवी ओझप्रमाणे त्यांना पाहत असतात,अशा माता ज्यांना मूल नको म्हणून कचर्‍याच्या ढिगावर नवजात बाळांना सोडतात, हम दो हमरे दो च्या काळात पहिली मुलगी असताना दुसरी नको म्हणून दुसर्‍या मुलीला मंदिराच्या पायरियवर ठेवनरे नग...अशी करणे खूप आहेत,पण या सर्वांची नीचता पाहून दया येणारे देवमानसणी अनाथआश्रम ची स्थापना केली.
     अगदी तसेच वृद्धाश्रमाचे ही तसेच आहे म्हटले तरी वावगे होणार नाही.आयुष्याभर मुलांसाठी कष्ट करणारे आईवडील ऐन म्हातारपणी पोरके झाले असतील,पैसे,प्रतिष्ठा बक्कळ असूनही एकटेपणा खूपच वाईट असे जानवल्याने त्यांची निर्मिती झाली असेल.परंतु पैसा हाच सर्वस्व समजणार्‍या आधुनिक समाजात आईवडील एकप्रकारे अडगळ ठरत आहेत.त्यामुळे व्रधश्रमात वृधांची संख्या वाढत आहे..
          विज्ञान सांगत कोणताही मनुष्य 160 डीसी वेदना विव्हळत सहन करू शकतो, तर बाळाला जन्म देताना आईला 230 डीसी वेदना होतात,म्हणजेच एकाचवेळी वीस हाडे चकणचुर झाल्यावर जेवढी वेदना होते तेवढी. आई आपल्यासाठी तेवढ्या वेदना अतिशय हसत हसत सहन करते मग वर म्हटल्याप्रमाणे आपण म्हातारपणात त्यांची आई का होऊ शकत नाही?
          सर्व साधारण पने प्रतेक जन ऊत्तर देईल की सून सांभाळ करू शकत नाही व सरळ मुलाला आणि सुनेला दोष देऊन मोकळे होतात.काही बाबतीत सत्य ही असेल पण काही बाबतीत हे असत्य ही....
 तर आपण याची एक बाजू पाहूया जी कोणी पाहताच नाही - सुनांचा सासुरवास आजही सुरूच आहे. शहरी भागात काहीसा कमी असेल कारण मुली स्वताच्या पायावर उभ्या असतात. पण ग्रामीण भागात आजही सुरूच आहे. आपण हातापायत ताकत आहे तोवर घरच्या सुनेला कधी सून समजत नाही तिला कधी लेकीसारख वागवत नाही कधी ती जेवली का उपाशी आहे,कधी काम करून थकली असेल तिला ही जीव आहे हे समजत नाही.मग हेच ती जीवनभर लक्षात ठेवते आणि पुढे तुम्ही म्हातारे झाले की उचकून काढते ती तुम्हाला माफ करू शकत नाही कारण तिने जिव्ंनभर तुम्हाला सोसल असत.म्हणूनच म्हणतात न चार दिवस सासूचे चार सुनेचे.
           काही प्रमाणात हे असत्य ही आहे,आजकालच्या बदलत्या काळात सासू,सासू पना करत नाही. उलट घराची सर्व जबाबदारी स्वता उचलून,सुनेला वेळेवर ऑफिस ला धडते,मुलांची जबाबदारी स्वता उचलते.त्यामुळे सासू जर सुनेच्या मागे घर सांभाळत असेल तर सुनेने सासूचा आदर करावा. मान्य आहे घर म्हटलं की कुठ कमी जास्त होत पण त्याचा अर्थ असा होत नाही की क्षनात नाते तोडावे. लग्नाआधी माहेरी आई सुद्धा बोलते,चुकल तर मारते सुद्धा म्हणून  काही आईचा राग किंवा तिरस्कार करत नाही ना. अगदी त्यापद्धतीने सुनेने ही सासुला समजून घ्यायला हव.
         याव्यतिरिक्त मला अस वाटत की सून नाही ना सांभाळू शकत तर तेव्हा मुलगा आहेच ना. ती बाहेरून आलेली मुलगी, आता आली आहे तेव्हा मुलाने हिम्मतीने म्हणायचं की बायानो नकात भांडू.आई वडील आहेत माझे,तर तेव्हा घेईन मी काळजी,मी टाकेल सुट्ट्या दवाखान्यात नेण्यासाठी,मी सुश्रूसा करेल,आणि बायको बाई तू त्यांचं निदान जेवण बनवशील का? वर म्हटल्या प्रमाणे प्रतेक जन म्हणाल की सुना सांभाळत नाहीत.पण माफ करा आई वडील ही आधी मुला - मुलींची आणि मग सुना जवयांची जबाबदारी असते. मला मान्य आहे की म्हातारपणी ज्यांची मूल सुना आहेत त्यांच्या नशिबी येऊ नये.पण दुसर्‍याकडे बोट दाखवताना आधी आपण काय केलय ह्याचा विचार होण गरजेचं. आपल्या आई वडिलांच्या सेवेचा पुढाकार घ्यायला हवा.ती स्त्री आहे मी पुरुष,आणि बाईच एक नसत म्हणून बायको च्या अंगावर नका टाकू जबाबदारी.जिच्या उदरात वाढलो आपण तिच्याशी कसली आहे रे लाज?त्यामुळे आपल्या पालकांची जबाबदारी स्वता घेण्याची तयारी असेल तरच लोकांच्या मुलीला आपण नाव ठेवू शकतो...
शेवटी जाता जाता ....
आपल्या समाजव्यवस्थेची बाजू मला तिरस्कृत करते,
मुलीनेच का लग्न करून मुलाच्या घरी जाव ?
जो मुलगा मुलीच्या घरी जाईल,का त्याला घरजावई लेबल लागाव ?
मुलीच्या घरच्यांनी पण कधी सासरचे होऊन पहावं !
अन मुलाच्या घरच्यांनी माहेरच होऊन बघाव !

त्यामुळे आता वृद्धाश्रम का निर्माण झाले व त्यास जबाबदार कोण याचा विचार न करता ते कसे लोप पावतील यासाठी प्रयत्नशील रहा आणि आई वडिलांचा सर्व प्रथम आदर करा.......!!!!

     

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

महिला दिन बद्दल दोन शब्द ........

       
            ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या कृतीने क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला. तो पास झाला.त्या अनुषंगाने भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस (८ मार्च) १९४३ साली साजरा झाला. १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या; मात्र एवढ्या वर्षांत परिस्थिती काही प्रमाणात आणि काही भागातच बदललेली दिसते आहे.मग यास खर्‍या अर्थाने जबाबदार कोण?
            आपण महिला दिवस आजही प्रामुख्याने साजरा करतो पण हेतु कदाचित बदललेला नाही कारण महिला दिवस म्हणल की महिलांची खरेदी वाढावी म्हणून आकर्षक सेल ठेवतात.यावरून कुठेतरी अस दिसून येत की महिला दिवस फक्त दसरा दिवाळी ला ज्या पद्धतीने खरेदी करून उत्सव साजरा केला जातो अगदी तसाच उत्सव आपण महिला दिवस ला समजून साजरा करतो आहोत.व यामागचा उद्देश ही व्यापारी च दिसून येतो. एकंदरीत काय तर आपण महिला दिवसाचे महत्व समजून घेतलेलच नाही अस म्हणता येईल.
           आज आपल्या समाजात स्त्रियांना पुरुषांबरोबर काम करण्याचे स्थान प्राप्त झालेले आहे त्यामुळे त्यांनाही आदर मिळतो आहे.पण काही ठिकाणी आजही स्त्रियांना मानाचा दर्जाप्राप्त नाही.मग अशा ठिकाणी शिक्षित स्त्रिया देखील कानाडोळा करत अन्याय हा सहन करतात. उदा. महाविद्यालय प्रांगणा मध्ये पाहिल असता चिकू च्या बिया एवढे डोळे उघडे ठेवून मुली वावरत असताना आपणास दिसून येईल. पण त्याच मुली लहान असताना शाळेच्या मैदानात अतिशय स्वतंत्र पणे वावगत असताना दिसून येतील.मग यावरून असे वाटते की मुली मोठी होता होता पारतंत्र्यात का जातात. का त्याही समाजाचा अतिशय निडर पणाने सामना करत नाहीत?
          मान्य आहे संस्कृती पुरुष प्रधान आहे पण पुरुष घडवण्यात व त्याला संस्कृती पुरुष प्रधान आहे म्हणून शिकवण्यात ही स्त्रीच जबाबदार असते असे मला प्रामुख्याने वाटते. कारण पाल्याचा प्रथम गुरु ही एक स्त्री असते,मग त्या अनुषंगाने स्त्री का शिकवत नाही मुलास की मुली देखील तुझ्या समान आहेत व मुलीस की तूलाही परिपूर्ण स्वतंत्र आहे.
            या सर्व प्रश्नाचे उत्तर समाज आहे. पण समाज हे फक्त पुरूषांचे मिळून तयार होत नसून समाज आपणा सर्वांचे मिळून तयार होते. त्यात स्त्री यांचा ही मोलाचा वाटा असतो. त्यास्तव या समाजाची मानसिकता बदलण्याची ताकत फक्त स्त्री मधेच आहे. असे मला वाटते. त्यामुळे प्रतेक स्त्री ने महिला दिवस हा उत्सव समजून साजरा न करता समाजा प्रती आपले काही देणे लागतो या विचाराने समोर येऊन कार्य करायला हव आणि समाजात चालत आलेल्या अशा रूढी परंपरेचा त्याग करायला हवा.
            कौटिल्य ने सांगितलं आहे की पुरुषां पेक्षा स्त्रिया प्रतेक गुणांत दुप्पट असतात मग हे वाक्य ध्यानी ठेवून पुरुषांनी देखील स्त्रियांचं आदर केला पाहिजे कारण कौटिल्य सांगतात की स्त्री ही पुरुषांपेक्षा सहा पट वाईट ही असते. व आपणास ही माहीतच आहे की प्रतेक यशस्वी मनुष्याच्या मागे एका स्त्री च हात असतो. आणि त्या उलटही म्हणजेच प्रतेक बरबाद मनुष्याच्या मागे देखील स्त्री च असते त्यामुळे स्त्री यांचा आदर करा.
           कारण महाविद्यालयाच्या प्रांगणात देखील परत एकदा ती मुलगी हसत खेळत वावरली पाहिजे एवढच........